|
|
|
|
Hindu Mahadev Koli Samaj History
|
| |
|
कार्यकर्त्यांचे आणि सामाजिक संस्थांचे योगदान
कोणत्याही क्षेत्रातील विकास हा त्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तुत्वान माणसांच्या कार्यांचा इतिहास असतो. अशा मंडळीच्या कार्याचा मागोवा घेतला कि त्या त्या कालखंडातील विकास प्रक्रियेतील दिशा, विविध समस्या व त्यावर कार्यकर्त्यांनी केलेली मात, लहानमोठ्या कार्यकर्त्यांनी विकास कार्यासाठी केलेली धडपड इत्यादी गोष्टी नजरे समोर येतात. कोणत्याही समाजाचा अभ्यास करताना अशा धडपडणाऱ्या व्यक्तींना दृष्टीआड करून चालत नाही. अशा कार्यकर्त्यांनी त्या समजासाठी खरोखर काय केले आहे कोणते योगदान दिले आहे याचा मागोवा घेणे हे पुढच्या पिढीला मार्गदर्शक होण्याच्या दृष्टीने महत्वाचे ठरते. त्यांनी समाजासाठी केलेले योगदान कोणत्या स्वरूपाचे आहे हे जनसामान्यांसमोर व तरुण पिढीपुढे ठेवणे याची आज गरज आहे. विस्तीर्ण जगाकडे उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या ह्या तरुणांना आजचे दिवस कोणत्या व्यक्तींच्या धडपडीमुळे आणि परिश्रमामुळे प्राप्त झाले आहेत, याचा ओझरता का होईना पूर्ण इतिहास सांगणे गरजेचे आहे. या दृष्टीकोनातून महादेव कोळी समाजासाठी धडपडणारी लहानमोठी कर्तबगार माणसे वाचकांसमोर आणण्याचा हा प्रयत्न आहे. समाजातील सर्वच कर्तबगार व्यक्तींचा आढावा घेणे तसे शक्य नसते. अशा वेळी काही कर्तबगार व्यक्तींचीही नोंद राहून जाणे हि अपरिहार्य बाब आहे. तेवढी उणीव दृष्टीआड करून हा मागोवा घेतला आहे.
गोपाळराव भांगरे
अकोले तालुक्याचे स्वातंत्र्य नंतरचे पहिलेच (१९५२) आमदार गोपाळराव भांगरे यांचा जन्म शेंडी ता. अकोले जि. अहमदनगर येथे शेतकरी कुटुंबात झाला. गोपाळराव हे मनमिळाऊ वृत्तीचे आणि मितभाषी स्वभावाचे होते. त्यांचे शिक्षण जुनिअर ट्रेंडपर्यंत झालेले होते. ते प्राथमिक शिक्षकाची नोकरी करत. विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. तालुक्यात अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले. त्यानंतर त्यांना सक्तीच्या शिक्षण योजनेत ऑफिसर म्हणून बढती मिळाली. शिक्षण क्षेत्रात असताना त्यांनी अनेक सामाजिक कामे केली. त्यामुळे जनतेत ते अतिशय लोकप्रिय झाले होते. १९५२ साली प्रथम विधानसभा निवडणुकीसाठी तालुक्यातून समाजातर्फे गोपाळराव भांगरे यांचे नाव पुढे आले. जनतेच्या आग्रहाखातर भांगरे यांनी त्यांचा नामनिर्देशन फॉर्म भरला. जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेऊन भरघोस मताने त्यांना निवडून दिले. गोपाळराव भांगरे यांनी शिक्षण , सामाजिक क्षेत्रात चांगले काम करून तालुक्यातील जनतेची मने जिंकली. स्वातंत्र्य चळवळीतील अनेक नेत्यांशी त्यांचा चांगला संबंध होता. त्यात ठक्कर बाप्पा, नाना पाटील, अच्युतराव पटवर्धन इत्यादींचा उल्लेख करता येईल. गांधीजी शांती आणि सत्याचे प्रतिक होते या तत्वानुसार त्यांनी तालुक्यात शांतता प्रस्थापित केली. शिक्षण क्षेत्रात त्यांनी लक्ष घातले व शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने तालुक्यात शिक्षणाला प्रोस्ताहन दिले. जनतेच्या आग्रहाखातर १९५७ साली पुन्हा ते कॉंग्रेसच्या तिकिटावर उभे राहिले. परंतु समशेरपूर ता. अकोले जि. अहमदनगर येथील प्रचारसभेत भाषण करत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यातच त्यांचे देहावसान झाले. त्यामुळे १९५७ साली फेर निवडणुकीत अकोले मतदार संघातून राजूरचे नारायण नावाली हे संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे निवडून आले.
|
|
|
|
History of Hindu Mahadev Koli Samaj in Mumbai Thane Bhayandar, Arya Samaj, Jain Samaj, marathi Samaj, google history, importance of history, definition of history, world history, meaning of history, web history, history of computer geography
|
|
Thank you for your interest. Please do visit our website again.
We thankful to all the people who give there time and support in developing this website. This is just a begining of the website. Letter on we will add more channels to give more information of our samaj.
We welcome your valuable suggestion and feedback. You can also send any article, News, or any our samaj detail related to any section of website with Hindu Koli Mahadev Samaj. We can add it in www.hindumahadevkoli.com website.
|
History of Hindu Mahadev Koli Samaj in Mumbai Thane Bhayandar, Arya Samaj,Jain Samaj, google history,importance of history,definition of history,world history, meaning of history, web history, history of computer geography,Bhayandar, Virar, Vasai, Naigaon, Bhiwandi, Dombivali, Mulund, Kalyan, Malad
|
|
|
|
|